मुंबई : काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय मुंबईतील जागावाटप करताना विश्वासात घेतले नाही, त्यामुळेही वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, अखेर वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!