मुंबई : लोकसभेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पक्षाचा वचननामा जाहीर केला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वचनामा जाहीर करण्यात आला या वचननाम्यात अनेक घोषणा  केल्या आहेत. 

ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय? 

  • राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
  • वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
  • जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
  • ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
  • बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
  • तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
  • कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार त्याला
  • हमीभाव शेतकऱ्यांना देणारच
  • उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
  • सत्तेचं विकेंद्रीकरण करु
  • कर दहशतवाद थांबवू
  • जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये  महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
  • जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!