मुंबई :एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावधानाने चूक झाली होती. राज्य लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा त्यांनी उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कसब्यात हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले. लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघाला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून कसब्यामध्ये त्यांनी भव्य रोड शो केला. यावेळी मतदारांशी त्यांनी संवाद साधला. ‘जेव्हा शेतकरी पाणी मागतो, त्यावेळेस काय दाखवतात? धरण. जाऊ दे ते मी बोलत नाही, अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *