mohite-Patil

सोलापूर, 24 एप्रिल: रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही असे म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टोलेबाजी केली.

50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचे पाणी मोहिते पाटील यांनी अडवले आहे. तर रणजितसिंह निंबाळकरांनी डाव्याचे पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता.

त्यामुळं निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असे शहाजीबापू पाटील म्हणाले. सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!