डोंबिवली : अंगावर कचरा का टाकला असे विचारल्यावर नागरिकाला १५ ते २० फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवार २५ तारखेला सायंकाळी साडे  पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या नागरिकाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. डोंबिवली शहरात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी या दादागिरीला चाप लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 शुभम ठाकूर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगावं येथील राहणारा हा तरुण सोमवारी डोंबिवली स्टेशनला उतरल्यावर स्टेशन बाहेर आल्यावर त्याच्या अंगावर फेरीवाल्यांनी कचरा टाकला. याचा जाब शुभमने विचारला असता १० ते १५ फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. घाबरलेल्या तरुणाने मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी पूर्णपणे कब्जा केलेला आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाकडूनही या बेकायदेशीर बसणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करीत नाही. रस्ते अडवून बसणा-या या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांचा ग्राहकांशी वाद झाल्यानंतर हे सगळे फेरीवाले एकवटतात व त्या ग्राहकाला माराहण शिवीगाळ करतात. फेरीवांल्याची दादागिरी खूपच वाढली आहे यातील अनेक फेरीवाले हे डोंबिवली बाहेरील आहेत त्यामुळे पोलिसांनी या फेरीवाल्यांच्या दादागिरीला तातडीने चाप लावण्याची गरज आहे अशी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!