मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवेल असं राणे यांनी स्पष्ट केलं. उमेदवार पक्ष ठरवेल, कुणी लुडबूड करु नये असा टोला नारायण राणे यांनी उदय सामंत यांचं नाव न घेता लगावला. माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीवर खालच्या भाषेत टीका केली. भाजपाला तडीपार करायची भाषा उद्धव ठाकरेंनी केली. पण आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. ज्यांनी कोरोनाकाळात पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करु असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरें याचा एकेरी शब्दात उल्लेख करत उद्धव ठाकरेची मानसिक स्थिती बिघडली आहे, तुझी लायकी आहे का? अशी टीका राणेंनी केली.

यावेळी  राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत पक्षाशी प्रामाणिक नाही. शिवसेना संपवण्यात राऊतांचा हात होता, असा आरोप राणे यांनी केलाय. अमेरिका, इटलीचे राष्ट्रप्रमुख पीएम मोदींचं कौतुक करतात, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणण्यात मोदींना यश आलं आहे. देशात गरिबांसाठी 54 योजना आणल्या. पण तू मुख्यमंत्री असताना जनतेला आणि गरिबांना काय दिलंस? असा सवालही राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!