ठाणे दि ९ ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला गाळ काढण्यासाठी बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला आहे. सदरचा गाळ पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणी पुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत आहे. सदरचा वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. परंतु या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.


स्टेम वॉटर डिस्ट्री.अँण्ड इन्फा.कं. प्रा.लि. यांच्याकडुन होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कंम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात सुरु राहणार आहे. तसेच बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी रात्री ९.०० ते गुरुवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत कळवा, साकेत, रुतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्याचा काही भागाचा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. दरम्यान या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *