कल्याण : गेल्या दहा दिवसांपासून राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे असा सल्ला केंद्रीय सामाजिक विकास मंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही नेत्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजप मनसे युतीवरही त्यांनी भाष्य केले भाजपसोबत रिपाइं असताना मनसेची गरज नाही असेही ते म्हणाले कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी रामदास आठवले कल्याणात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत. हा वाद मिटला गेला पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाही. .नारायण राणेची भाषा ही शिवसेनेची भाषा आहे शिवसेनेत त्यांचें आयुष्य गेलेलं आहे.. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे मत आठवले यांनी व्यक्त केले

रामदास आठवले म्हणाले की राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण गेले अनेक वर्षे शिवसेना- भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. त्यांनी एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते असे आठवले म्हणाले

भाजपसोबत रिपाइं असताना मनसेची गरज नाही

मनसे आणि भाजपची युती होणे अशक्य आहे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे तर मनसेची भूमिा मराठी मराठी आहे भाजपला त्यांच्या सोबत जाणं परवडत नाही त्यामुळे भाजपचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे भाजप सोबत आरपीआय असताना मनसेची आवश्यकता नाही. आगामी मुबंई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय जिंकेल मनसेची आवश्यकता नाही. आगामी केडीएमसी पालिका निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत राहील असेही आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *