१० मार्च मुंबई: २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या विजयाचे आणि समोरच्या पक्ष किंवा आघाडीच्या पराभवाचे दावे सगळेच करताना दिसत आहेत.

राजकीय वर्तुळात सध्या जागावाटप व आघाडी-युतीमध्ये समावेशाच्या चर्चा-बैठका होताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर २०२४ नंतर नेमकं काय होणार्‍यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे अध्यक्ष व कें द्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दावा के ला आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेले रामदास आठवले यांनी यादरम्यान बोलताना आगामी राजकीय भवितव्याविषयी भाष्य केलं आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याआधीच २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोदींसह एनडीएमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट के लं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचीही घोषणा के ली आहे.

२०२४ च्या निवडणुकांनंतर आपण मंत्री होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.यावेळी रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार भारताचं संविधान बदलणार असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला ‘संविधान सदन’ हे नाव दिलं आहे.

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे मोदी संविधान बदलणं शक्य नाही. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच”, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी मोदींना समर्थन दिलं आहे.

नरेंद्र मोदी अनेकदा इथे आले. भारत सरकारच्या वतीने हजारो कोटींची मदत मुंबईमहाराष्ट्राला दिली आहे.

त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. मोदी पंतप्रधान झाले, की मी मंत्री होणार हे निश्चित आहे”, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीची प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नसताना रामदास आठवलेंनी त्यांच्या मंत्रीपदाबाबत विश्वास व्यक्त के ल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *