कल्याण : कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रिक्षात एक महिला दागिन्याने भरलेली बॅग विसरली होती. रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे. महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे. महिलेने देखील रिक्षा चालक व पोलिसांचे आभार मानले रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *