ठाणे, दि.३० : कोरोनाच्या ओमायक्रॉन नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व शाळा उद्या दि.१ डिसेंबर ऐवजी दि.१५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिले असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तसेच नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा दि.१४ डिसेंबर २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र दि. ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू असलेले ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *