अंबरनाथमध्ये सव्वा एकर जागेवर साकारणार  लवकरच जागतिक दर्जाचे शुटींग रेंज, पालकमंत्रयानी केलं भूमिपुजन

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या  विम्को नाका येथील पडीक जागेवर ठाणे जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज उभारण्यात येत असून  शुक्रवारी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुटींग रेंजचे भूमीपुजन करण्यात आल.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची अडचण लक्षात घेऊन अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शुटींग रेंज व्हावे यासाठी सन २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. त्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने सुमारे सव्वा एकर जागा दिलीय. जागेत १० मी., २५ मी. व ५० मी. चे ३ लेनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचे जागतिक दर्जाचे शुटींग रेंज बांधण्यात येणार आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,, अंबरनाथ शहर कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करत असून, शूटिंग रेंजमुळे क्रीडा क्षेत्रात देखील नावारूपाला येईल. क्रडी युगाची ही नांदी आहे असेही ते म्हणाले. सातत्याने पाठपुरावा करून शुटींग रेंजसाठी जागा मिळविल्याने खासदार शिंदे यांचे त्यांनी कौतूक केले. तसेच त्यासोबतच समोरील सात एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्याचेही भूमिपूजन पालकमंत्रयाच्या हस्ते पार पडले. क्रीडा संकुलात जॉगिंग करता ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे तसेच, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट तसेच अन्य खेळांना चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल वाळेकर, शहर अभियंता मनिष भामरे, अंबरनाथ रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबचे सुचिता देसाई, आनंद देसाई, जगदीश किनळेकर उपस्थित होते.

खेळाडूंचा त्रास वाचणार
महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शुटींग रेंज उपलब्ध आहेत. परंतु , मुंबईत फक्त वरळी येथे १० मी., २५ मी. व ५० मी. या तीन लेनचे शुटींग रेज बांधण्यात आले आहे. जागतिक शुटींग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी २५ व ५० मी. ची रेंज आवश्यकता असते. अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना २५ व ५० मी. रेंजच्या शुटींग सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता. अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या खेळाडूंसाठी अंबरनाथमध्ये चांगलीच सोय झाली असून मुंबईचाही त्रास वाचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *