ठाणे : रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे हक्काचे घर देण्याचा शिवसेनेने दिलेला शब्द पाळला आहे. शिवसेनेच्या प्रयत्नानंतर ठाणे महानगरपालिकेने रुणालीला हक्काचे घर दिले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रुणालीला नवीन घराची चावी दिली. त्यावेळी रुणालीचे सर्व कुटुंब उपस्थित होतं.


स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मानपाडा येथे राहणाऱ्या रुणाली कडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *