मुंबई ( अविनाश उबाळे ) : सध्या राजकारणात सुरू असलेल्या तळ्यात,मळ्यातील खेळाकडे बिलकुल लक्ष देऊ नका.येणारं पुढील सरकार आपलंच असेल हा विश्वास व्यक्त करत पुढील विधानसभेत शहापूरचा शिवसेनेचा अभेद्य गड राखा असे आव्हान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहापुरातील शिवसैनिकांना केले.

शहापूर तालुक्यातील आदिवासी म ठाकूर समाजाचे नेते जानु हिरवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी पक्ष प्रवेशासाठी जमलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे.हा बालेकिल्ला पुढील काळातही अभेद्य ठेवा असे आव्हान त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

ते म्हणाले की दसरा मेळाव्यात मी बोललं आहेच परंतु आता लवकरच भिवंडी लोकसभे मध्ये मी एक प्रचंड मोठी जाहीर सभा घेणार असून त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील राजकारणावर सविस्तर बोलेल असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना स्थानिक पदाधिकारी काशिनाथ तिवरे यांसह मोठ्या संख्येने शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *