रिपाइंच्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात ठाणे, भिवंडीतील महिला आघाडीचा सहभाग 
दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) चे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडियम येथे  नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात ठाणे जिल्ह्यातील महिला आघाडीने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.रिपाइं च्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले, राष्ट्रीय सचिव शिलाताई गांगुर्डे यांचे हात बळकट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महिला आघाडी सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे पार पडले.
  
भिवंडी महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिता राजेश गायकवाड, कल्याण ग्रामीण अध्यक्षा वनिता मोरे, जिल्हास्तरीय पदाधिकारी युवक आघाडी अरुण गायकवाड, श्याम शेवाळे, संजय भालेराव, भगवान जाधव आदी पदाधिकारी यावेळी अधिवेशनात उपस्थित होते. ठाणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन एअर लाईनने आगमन आणि निर्गमनाने हजेरी लावली होती. विविध राज्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण आणि शहर महिला आघाडीचा विशेष सहभाग होता. या अधिवेशनानंतर महिला आघाडी मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीतील अनेक स्थळांना महिलांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *