कल्याण: कल्याणचा पत्रिपुल दिवाळीत रोषणाईने उजळून निघाला आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या संकल्पेतून हि रोषणाई करण्यात आली असून कल्याणकरांचेच नव्हे तर या रस्त्याने जाणाऱ्या हजारो वाहन चालकांचे जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत.

कल्याण डोंबिवलीला जोडणारा पट्रिपू ल हा महत्वाचा दुवा आहे. भिवंडी व्हाया नाशिक आणि कल्याण शीळ रोड व्हाया ठाणे मुंबई आणि पनवेल नवी मुंबई कडे जाणारा मार्ग हा पत्रिपुलावरून जातो. त्यामुळे पत्रिपूलावरून दररोज हजारो वाहनाची वर्दळ असते. दिवाळी निमित्त पत्रिपुलावरील पत्रिपुलास डोळ्यांचं पारणं फेडणारी रोषणाई करण्यात आलीय. पत्रिपुलाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली ही रोषणाई पाहण्यासाठी लोकांनीही गर्दी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *