‘त्या’ 22 मृतदेहांच्या विटंबना प्रकऱणी मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई, : एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी केलेला हा प्रकार मानवतेची क्रुर थट्टा आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. जीवंत अन् मेलेल्या माणसांनाही जनावरासारखी वागणूक देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा आणि प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त व संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *