मुंबई : गेल्या वर्षीपेक्षा तुलनेने कमी पाऊस झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यापर कोणताही परिणाम होणार नाही. राज्‍य शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्‍ध करून दिले आहे. सद्यस्थितीत मुंबईकरांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. येत्‍या पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, पाणीकपात होणार नाही, अशा रीतीने नियोजन केलेले आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

जून ते सप्‍टेंबर २०२३ दरम्‍यान झालेल्‍या कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा तुलनेने कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. तसेच शहरात पाणीकपात करण्यात येणार नाही. राज्‍य शासनानेदेखील मुंबईसाठी पाणी उपलब्‍ध करून दिले आहे. त्यामुळे येत्‍या पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा रीतीने नियोजन केले असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पालिका मुख्‍यालयात मंगळवारी झालेल्‍या उच्‍चस्‍तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्‍यात आला. धरणातील उपलब्‍ध पाणीसाठ्यावर महापालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राज्‍य शासनानेदेखील निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्‍याचे यापूर्वीच मान्‍य केल्यामुळे पाणीकपात करण्यात येणार नाही; मात्र मुंबईकरांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *