कल्याण दि.20 ऑक्टोबर : ठाण्यात क्लस्टर योजना लागू करण्यात आलीय मात्र अजूनही कल्याण डोंबिवलीसह भिवंडी उल्हासनगर अंबरनाथमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी महाविकास आघाडी सरकारला घराचा आहेर दिलाय. ‘सरकार आमचे असले तरी वेळ पडल्यास आम्ही त्यांच्याविरोधात दोन हात करू’ असा इशारा हिंदुराव यांनी दिला आहे.

कल्याणात येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मंत्री आणि नेत्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद हिंदुराव यांनी क्लस्टर योजनेवरून आपल्याच सरकारविरोधात आवाज उठविला आहे.

ठाणे जिल्ह्यापर्यंत क्लस्टर आले असून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कुलगाव बदलापूर, भिवंडीमध्येही ही योजना लागू झाली पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाला परवडणारी घरं मिळू शकतील असे सांगत राज्य सरकारला आम्ही त्यासाठी भाग पाडू अशी पक्षाची भूमिका असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात आपल्याच सरकारचे दोन मंत्री असल्याबाबत आठवण करून दिली असता ‘ओरडल्याशिवाय काहीही मिळत नाही, आमच्याच पक्षाचे सरकार असले तरी समाजासाठी त्यांच्याविरोधातही दोन हात करण्याची तयारी आम्ही ठेवल्याचे सांगत एकप्रकारे हिंदुराव यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.

https://twitter.com/cjournalist4/status/1450896027079176192?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *