डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून घडणा-या घटनांमुळे सुशिक्षित व सुसंस्कृतनगरी परिसर हादरून गेलीय. एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर, आता लुटीच्या उद्देशाने रिक्षामधून दोन्ही प्रवाशांना बाहेर काढून एकाची गळा चिरून तर दुस-याला मृत झाल्याचे समजून लुटारू पसार झाल्याची धक्कादायक घटना कल्याण डोंबिवलीला जोडणा-या ९० फीट रस्त्यावर घडलीय. या घटनांमुळे पून्हा एकदा डोंबिवली हादरून गेलीय.

डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारे बेचनप्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे फर्निचर तयार करण्याचे काम करतात. हे दोघे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. हे दोघे रात्री गावी जाण्यासाठी कल्याण स्टेशनला निघाले होते. रिक्षा खंबाळपाडा परिसरात पोहचताच काही लोकांनी रिक्षा थांबिवली. दोघांना रिक्षाबाहेर काढले. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घेऊन दोघांना मारहाण केली. यात एकाचा गळा कापला. दुसरा जखमी अवस्थेत झाडी झुडपात पडला. तो मृत झाल्याचा समजून या दोघांच्या खिशातील रोकड घेऊन लूटारु पसार झाले. दोघांची बॅग आणि मोबाईल रेल्वे ट्रकच्या बाजूला सापडले आहेत. सकाळी शुध्दीवर आलेल्या बबलूने आपल्या परिसरात पोहचताच हा प्रकार भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितला. त्यांनी बबलूला घेऊन त्यांनी टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता बेचनचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. बबूने दिलेल्या माहितीनुसार लुटीच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे मात्र मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने हत्या कि अपघाती मृत्यू असा संशय निर्माण झाला आहे याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *