ठाणे जिल्ह्यात मनसेने बुलेट ट्रेन सर्व्हेचे काम बंद पाडले

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे ह्या ठिकाणी होता असलेल्या बुलेट ट्रेन सर्व्हेचे काम मनसेने बंद पाडले. इतकेच नाही तर आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रांत अधिकारी श्री. संतोष थिटे, नायब तहसीलदार श्री संदीप आवारी, हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आंदोलनकर्त्यांशी जमिनीवर बसून चर्चा केली व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चाकरून त्यांची मान्यता घेतल्याशिवाय पुढील काम करू नये ही मनसेची मागणी व मोजणीचे काम थांबविण्याविषयी शासनाकडे लोकभावना पोहोचविण्याचे मान्य केले.

मनसे प्रदेश उपाध्यक्ष . डी. के.म्हात्रे, भिवंडी लोकसभा संपर्क अध्यक्ष राजन गावंड , यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हा सचिव संजय पाटील, जिल्हा अध्यक्षा सौ. कामिनी खंडागळे, तालुका अध्यक्ष श्री.शिवनाथ भगत, मनविसे जिल्हा संघटक श्री.संतोष साळवी, जेष्ठ पदाधिकारी श्री. शैलेश बिडवी, तालुका अध्यक्ष श्री. कांतिकुमार ठाकरे तालुका सचिव शरद नागावकर, भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप बोडके व अफसर खान तसेच उपतालुका अध्यक्ष श्री रोहिदास पाटील, हनुमंत वारघडे व अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *