आरक्षण मिळालं तर जल्लोष, अन्यथा आंदोलन !
ठाण्याच्या बैठकीत मराठा समाजाच्या इशारा 
ठाणे (उमेश वांद्रे) :   मराठा समाजाला आज निर्णय मिळण्याची अपेक्षा होती. परंतु उद्या( गुरुवारी) निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सरकारने उद्या या  बाबतीत निर्णय घ्यावा या साठी उद्या सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मराठा बांधव तलावपाळी येथे बसणार आहेत आरक्षण मिळालं तर जल्लोष नाही तर आंदोलन असा इशारा बैठकीत घेण्यात आला.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आज मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली त्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.  आम्हाला टिकणारे आरक्षण पाहिजे. आरक्षण मिळालं तरी देखील कोर्टाची पायरी चढणार, आणि  नाही मिळालं तरी कोर्टत जाणार असल्याचा निर्णय देखील बैठकीत झाला असल्याचं ठोक मोर्चाच्या पद्धधिकार्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष वेधलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *