मुंबई : लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदची हाक दिली मात्र विरोधी पक्षानं यावर जोरदार टीका केली. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

फडणवीस म्हणाले की, ‘आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. बंद करणारी ही तीच मंडळी आहे की ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे आंदोलन करायची नैतिकता तरी आहे का? असा सवालही फडणवीसांनी केला आहे. तसेच लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार यावर कारवाई करत आहे. मात्र आजचा बंद हा तेथील घटनेविषयी संवेदना दाखवण्यासाठी नाही, तर त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचारने केलेला आहे’ असे म्हणत फडणीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *