ठाणे : – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीमध्ये सुमारे १०८ महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता.

यावेळी सुप्रियाताई म्हणाल्या की, वर्षातून एकदाच माझ्या आजी शारदाबाई पवार या नवरात्रौत्सवात उपवास करायच्या; शारदाबाई पवार यांच्यापासून सुरु आहे. ही परंपरा माझ्या आईने कायम ठेवली होती. त्यामुळे नवरात्रौत्सव ही माझ्यासाठी आई आहे. या निमित्ताने मी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानते की त्यांनी नवरात्रौत्सवातच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. तरीही, सरकारने जे नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी या महाआरतीचे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *