लोकलखाली चिरडून पुण्यातील तिघी माय-लेकी ठार
डोंबिवली : भरधाव लोकलखाली चिरडून पुण्यातील 3 मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना ठाकुर्ली स्टेशन जवळ घडली. हे तिघेही पुण्याहून मुंबईला येत होते. राधिका (८), संचिता (११) आणि या दोघींची आई अनुराधा प्रकाश कवलकर (३२) अशी मृत माय-लेकींची नावे आहे.
पुण्यातील त्रिवेणीनागर एमआयडीसी परिसरात हे राहत होते. राहणाऱ्या आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुण्याहून इंटरसिटी एक्स्प्रेसने नाशिकला जाण्यासाठी निघाल्या. यांना कल्याण स्टेशनवर उतरायचे होते. मात्र इंटरसिटी एक्सप्रेस कल्याणमध्ये थांबत नसल्याने ही एक्सप्रेस कल्याण स्टेशन सोडून पुढे आली. ठाकुर्ली स्टेशन जवळ सिग्नलला ही एक्सप्रेस थांबताच, गाडीतील अन्य प्रवाश्यांसह या तिघीही खाली उतरल्या. याचवेळी कल्याणकडे भरधाव वेगात जाणाऱ्या लोकलखाली या तिघी माय-लेकी चिरडल्या. राधिका व संचिता या दोन्ही मुलींचे मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आले. मात्र आई अनुराधा गंभीर जखमी असल्याने त्यांना तिला मुंबईला सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुपारी एकच्या सुमारास दुर्दैवी अनुराधाचाही मृत्यू झाला. डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंदी करण्यात आली आहे. संध्याकाळी च त्यांच्या नातेवाईकााआणि ना तेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *