मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील  ३०,५००  कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.दुपारी ३:३० वाजता, शिवडी दक्षिण मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे.

सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे

एकूण लांबी २१.८० किमी. आहे

सागरी अंतर १६.५ किमी आहे.

देशातील सर्वात लांब व जगातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू .

पाच बोईंग विमाने, १७ आयफेल टॉवर यांच्या वजनाइतके पोलाद वापरून तसेच ८४ हजार टन वजनाचे ७० स्टील डेक बसविण्यात आले आहे.

आधुनिक अभियांत्रिकी जगतातील तंत्र कौशल्याचा देखणा आविष्कार..

मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील प्रवासाचे अंतर कमी करणारा सेतू

मुंबईहून पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय.

सागरी सेतुवरून ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. त्यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील संपर्क सुधारेल.

रायगड जिल्ह्यातील पनवेल ते दक्षिण-मध्य मुंबईतील शिवडी हे अंतर 15 किलोमीटरने कमी होईल, तर प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांवरून 15 ते 20 मिनिटांवर येईल.

अटल सेतूची रचना मुख्य मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील संपर्क अधिक वाढेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

पुलाचा काही भाग फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातून जात असल्याने शिवडीपासून 8.5 किमी लांबीचा ध्वनी अवरोधक स्थापित करण्यात आला आहे.

2018 पासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 5,403 मजूर आणि अभियंत्यांनी काम केले आहे.

समुद्रसपाटीपासून 15 मीटर उंचीवर बांधलेला सागरी पूल हा बांधकामाचा सर्वात कठीण भाग होता. सागरी भागात, अभियंते आणि कामगारांना समुद्राच्या तळापर्यंत सुमारे 47 मीटर खोदावे लागले.

पावसाळ्यात वेगाचे वारे सहन करण्यासाठी प्रकाशाचे खांब खास तयार केले आहेत. विजेमुळे होणार्‍या संभाव्य नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी लाइटिंग प्रोटेक्शन सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे.

इतर विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन

पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान करणार पायाभरणी

रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे ‘भारतरत्नम’ आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन

रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण

महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ

पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

महोत्सवाची संकल्पना – विकसित भारत@2047: युवांसाठी, युवांद्वारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *