नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने या कार्यक्रमावर काँग्रेसह २१ प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संसद हा जनतेचा आवाज आहे मात्र नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याभिषेक समजत आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *