मुंबई – रोजगार हमी योजनेतून कांदाचाळ उभारण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान सुरू होते. परंतु काही दिवसापूर्वी हे अनुदान न देण्याचा धक्कादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान सुरू करणेबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

शासनाच्या आदेशानुसार यापुढे कांदाचाळ योजनेचा लाभ सामुदायिकरीत्या शेतकरी किंवा स्वयंसहायता बचत गट अथवा शेतकऱ्यांचे उत्पादक गट किंवा शेतकरी संघ लाभ घेऊ शकतील, असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान मिळणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघात कांद्याचा मुद्दा गाजला होता.

त्यामुळे ‘रोहयो कांदाचाळ’ अनुदानातून वैयक्तिक शेतकऱ्यांना वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा नाराजीचा सूर उमटला आहे. या अनुषंगाने रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना तात्काळ कांदाचाळ अनुदान सुरू करावे, यासाठी आज सदाभाऊ खोत यांनी मुख्यमत्र्यांकडे आणि उप मुख्यमत्र्यांकडे निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *