डोंबिवली :- डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील काळू बाई मंदिर लगत असलेल्या महावितरण कंपनीच्या विजेच्या खांबाजवळ दुपारी तीन वाजण्याचा अचानक आग लागल्याने नागरीक भयभीत झाले होते. महावितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांनी सदर घटनेची माहिती देताच कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत कंपनीचे अधिकारी यादव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विजेच्या खांबाजवळील केबलला आग लागली होती .मात्र आग लागली का लावली असे अद्याप समजू शकलेले नाही. केबलला लागलेली आग विझविण्यासाठी दोन तास परिसराचा वीज पुरवठा खंडीत केला होता. आग विझविल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. दरम्यान अनेक विजेच्या खांबाजवळ केबल जाळे पसरले असून यातून वीज प्रवाह वाहत असल्याने भविष्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण हेाण्याची शक्यता आहे त्यामुळे वीज कंपनीने सगळया वीजचेच्या खांबाची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून हेात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *