दर मंगळवारी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहाणार
डोंबिवली : उल्हास नदीतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी  आता दर मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील  पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 असा 24 तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे लघु पाटबंधारे  विभागाने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. आता दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या मंगळवार पासुन होणार आहे . नागरिकांनी पाणी जपून वापर असे आवाहन पालिकेन केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *