मुंबई, दि. ९ः 
विधान परिषदेचे सभापतीपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन निवडणूक घेण्याबाबतची मागणी केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते.

दानवे यांनी भेटी विषयी माहिती दिली. ते म्हणाले की, विधान परिषदेचे सभापतीपद मागच्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. त्याची निवड व्हावी अशी मागणी वारंवार सभागृहात केली आहे. हे पद रिक्त ठेवणे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवणे राज्यपालांच्या अख्यारित येते. त्यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने यासंदर्भात राज्यपालांना कळवायला हवे. परंतु अद्याप त्यांना कळविण्यात आलेले नाही. म्हणूनच भेट घेतल्याचे सांगताना राज्यपालांनी आमच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *