मुंबई : कोणाच्याच मागे पिडा लागू नये. ईडीची पिडा लागू नये असं कोणीच वर्तन करू नये हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. जयंत पाटील यांनी ईडीची पिडा लागली असे वक्तव्य केलं होते त्यालाच फडणवीसांनी टोला लगावला आहे.राज्यात मदिरालय सुरू होऊ शकते तर मंदिर का नाही ? सर्व राज्यामध्ये मंदिर सुरू आहेत फक्त महाराष्ट्रात बंद आहेत त्यासाठी बाप्पा राज्य सरकारला सुबुध्दी देवो असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशावर कारेानाचे संकट आहे महाराष्ट्रात देखील कोरोना आहे त्यामुळे कारेानाचे संकट गणपती बाप्पाने दूर करावे तसेच महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची शक्ती शेतक-यांना द्यावी गणपतीने सर्वांना सुबुध्दी द्यावी अशी प्रार्थना गणेश चरणी केल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *