कल्याण : कल्याण पूर्व विभागात महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरू करावी अशी मागणी कल्याण विकासिनी चे अध्यक्ष व माजी नगरसेवक ऍड.उदय रसाळ यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


कल्याण पूर्व विभागात गरीब, मध्यम वर्गीय सर्वसामान्य नागरिकांची वस्त्ती मोठ्या प्रमाणावर आहे. चाळी, झोपडपट्टी आणि जुन्या इमारतीत मोठया प्रमाणात चाकरमणी राहात आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोविड काळात लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी, व्यवसायाला मुकावे लागले आहे. त्यामुळे आर्थिक बिकट परिस्थितीत लोक राहत आहेत.खाजगी शाळा व त्यांची फी कल्याण पूर्वेतील मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षणा पासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे कल्याण पूर्वेत महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा १० वी पर्यंत सुरू व्हावी .जेणे करून गरीब, कामगार कष्टकरी लोकांची मुलांना शाळा शिकण्याची व्यवस्था होईल आणि ते शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याकडे रसाळ यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *