डहाणुत ४० विद्यार्थ्यांची बोट उलटली.. 32 जणांना वाचवण्यात यश

डहाणू : डहाणूत ४० विद्यार्थ्यांना समुद्रात सहलीसाठी घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली. 32 विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आलं आहे या घटनेत ४ विद्याथ्र्यांची मृत्यू झाला असून  ४ विद्यार्थी बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालायात उपचारासाठी हलवण्यात आलंय.
पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा या हायस्कूलमधील ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत. ४० विद्यार्थ्यांना घेऊन समुद्र सफरीसाठी ही बोट निघाली. मात्र डहाणू समुद्र किनाऱ्यावरून जवळपास दोन नॉटिकल अंतरावर बोट आली असतानाच  ही घटना घडलीय. विद्यार्थ्यांच्या सेल्फी काढण्याच्या नादात ही घटना घडल्याचं समजतंय. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *