मुंबईः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर नारा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व तसे आदेश दिले आहेत. राज्यात तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता असतानाच काँग्रेसनं स्वबळाची भूमिका घेतल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेसनं असा पवित्रा घेतल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *