डोंबिवली : लोकल प्रवासात मोबाईल चोरटयाशी झालेल्या झटापटीत डोंबिवलीत राहणाया विद्या पाटील यांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे त्यांच्या तीन मुलांचे मातृछत्र हरपले आहेण  काँग्रेसकडून पाटील कुटंबियांचे  सांत्वन करण्यात आले.  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फोनवरून विद्या पाटील यांचे पती ज्ञानेश्वर पाटील यांना धीर दिला. काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरून पाटील कुटूंबियांशी बोलणे करून दिले. पाटील कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी  पमेश एकनाथ म्हात्रे, शरद नाना भोईर, गौरव शंकर माळी, अभय तावरे, प्रणव केणे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *