मुंबई, ६ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये (Lakhimpur) शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
.
जयंत पाटील म्हणाले की, ‘लखीमपूरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारले आहे. यात त्याचा सहभाग दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे, अशी टीका पाटील यांनी केली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’, असंही पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *