२४ तास उलटूनही भिवंडीची आग अजूनही धुमसतेय..

भिवंडी: येथील माणकोली भागात गोदामांना आग लागून तब्बल २४ तास होत आले. मात्र अजूनही आग धुमसतेय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.
बुधवारी सकाळी १० च्या सुमारास मानकोली ओवली परिसरातील चेक पॉइंटच्या गोदामाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत आजूबाजूच्या तब्बल १६ गोदामांना भक्ष्यस्थानी घेतले. सकाळी दहा वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत. मात्र २४ तास होऊनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर ,ठाणे येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झालेत. आत्तापर्यंत १६ गोदामं संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. शिवाय मोठं आर्थिक नुकसानही झालंय. त्यामुळं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र त्याला अजून किती वेळ लागेल, हे सांगता येणं कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *