भिवंडीत वऱ्हाडाची बस कोसळून ३२ प्रवासी जखमी 

भिवंडी :. धुळ्याहून वसईकडे निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात झाल्याने या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी अंबाडीलगतच्या सैतानी पुलाजवळ घडली आहे.

चितोड ( धुळे ) येथील नवरी माधुरी प्रकाश वाघ हिचे लग्न लावण्यासाठी वऱ्हाडी बस सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वसई येथे जाण्यासाठी निघाली होती.प्रवासी बस भिवंडी अंबाडी मार्गे भरधाव वेगात जात असताना सैतानी पुलाजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खोल खड्यात कलंडली.या बसमधून  ५५ वऱ्हाडी प्रवास करीत होते.त्यातील ३५ प्रवाशी जखमी झाले असून सरला संजय वाघ ,रत्ना वाघ ,मनोज वाघ ,भगवान वाघ ,नंदूलाल वाघ,प्रकाश वाघ ,लहू वाघ आदी ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना अंबाडीच्या साईदत्त व जीवदानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *