मुंबई : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दि. 15 मार्च 2023 ते दि. 13 मे 2023 या कालावधीत संध्याकाळी 18.00 ते सकाळी 06.00 या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी 18.00 वा ते सकाळी 6.00 वा. या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेवून नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो.

त्यामुळे दि. 15 मार्च 2023 ते दि. 13 मे 2023 या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *