भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक कधी ?  प्रकाश आंबेडकर

मुंबई :  पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक कधी करणार असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून दलित तरुणांची धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबविण्यात यावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोंबिंग ऑपरेशन तात्काळ बंद केलं जाईल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच आरोपींवर कारवाई होईल आणि त्यांना अटकही केली जाईल. असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण संभाजी भिडेंना अटक होते की नाही ही गोष्ट आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *