मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहाल शब्दात टीका केली आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे लवकरच जेलमध्ये असतील, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.  

  राणे हे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना धारेवर धरलं. आदित्य ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, ‘कोण आहे? मी त्यांना गांभीर्याने घेत नाही. यांची शिवसेना अधोगतीकडे येऊन पोहोचली आहे’.  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी राज्यात १६ चे १६० आमदार होतील, असा दावा केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. ‘१६ चे १६० करू? त्यासाठी जादूची कांडी आहे का? असा सवाल  राणेंनी केला आहे.  

१६ पैकी निवडणुकीत ५ पण येणार नाहीत. पक्षातील जे आमदार होते, ते दिवसा ढवळ्या पळून गेले. काही दिवसांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत जेलमध्ये सोबत असतील. यांना १६० जागा सुद्धा मिळणे कठीण आहे. ज्यांनी खोक्यांची डिलिव्हरी केली, त्यांच्यासमोर खोक्याचा विषय बोलू नये, असेही राणे म्हणाले.  आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरूनही राणेंनी निशाणा साधला. ‘कोकणात पाहुणे येतात त्यानंतर कोंबडी वडे खाऊन जातात. त्यांनी आजपर्यंत कोकणाला काय दिलं? आदित्य ठाकरे शिवसैनिकांना का बघत नाहीत? अवस्था बिकट आहे. जे शिवसेनेत आहेत, ते पद वाचवायला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाहीत, असा टोला राणेंनी लगावला.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *