कल्याण : कल्याण पूर्व भगवान नगर येथील संयुक्त मित्रमडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता संदिप( चिंट्टया) पाटील यांचे रत्नागिरी येथून आपल्या कुटुबासह येताना कृरकाळाने झडप घालून कुटुंबातील बहिण, मावशीसह अपघाती निधन झाले, ही दु्दैवी घटना शनिवार २६ फेब्रुवारी रोजी घडली.


संदिप हा शिवसेनेचा कट्टर समर्थक होता. परिसरात चिंटू नावाने सर्वांशी परिचित होता, परिसरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी  रात्री अपरात्री धावून जायचा .गणेशोत्सव, नवरात्र उत्सव इतरही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करायचा. मनमिळाऊ कार्यकर्ता गेल्याने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अंत्ययात्रेत माजी महापौर रमेश जाधव,  नगरसेवक राजाराम पावशे यांच्यासह परिसरातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *