डोंबिवली दि.27 जुलै : कोकणातील चिपळूण, महाड परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात महापूर आला हेाता या महापुरा हजारो कुटूंबिय उघडयावर पडली आहे. अंगावरच्या कपडयांशिवाय एकही वस्तू शिल्ल्क राहिलेली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी सर्वच स्तरातून मदत पेाहचवली जात आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत पाठवली जाणार आहे. यामध्ये डोंबिवलीचे स्थानिक नेते रमेश म्हात्रे यांनी तब्बल ५०० किलो खाद्यतेल देत सिंहाचा वाटा उचलला आहे. लवकरच ही सर्व मदत महाड आणि चिपळूणला रवाना केली जाणार आहे. पुराने कोकणवासियांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त केले आहेत. अशावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. या विचाराने आपण मदतीसाठी हा खारीचा वाटा उचलला अशी प्रतिक्रिया रमेश म्हात्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *