A fire broke out at the mobile tower on the terrace of Shiv Shakti Society in Samarth Nagar area of Advali village in Kalyan East

कल्याण : कल्याण पूर्वेतील अडवली गावातील समर्थ नगर परिसरात असलेल्या शिवशक्ती सोसायटीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरलं.

तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या आगीत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

मोबाईल टॉवरला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॉवरला आग लागल्यानंतर काही क्षणातच भडकलेल्या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं.. रहिवाशांनी इमारतीमधून बाहेर पळ काढला. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर या मोबाईल टॉवर वरील आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. दरम्यान हा मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय..टॉवर काढून टाकण्याबाबत अनेकदा संबंधित बिल्डरकडे मागणी केली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील रहिवाशांनी केला. या घटनेमुळे इमारतीवर लावण्यात येणा-या अनधिकृत टॉवरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *