कल्याणातही फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड
कल्याण : रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली 15 दिवसाची डेडलाईन संपल्यानंतर शनिवारी  मनसैनिक आक्रमक झाले. मनसेने ठाण्यानंतर कल्याण  रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.

मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘संताप मोचा काढण्यात आला हेाता. यावेळी राज यांनी 15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. अन्यथा १६ व्या दिवशी बघतोच असा दम भरला होता. त्यानुसार मनसेने ठाणे व कल्याणातील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करून त्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले. दरम्यान डोंबिवली रेलवे स्थानकात मनसेची रेलवे स्टेशन मास्तर कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *