कल्याण :कोरोना लॉकडाऊन मध्ये अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून अनेकांनी या दिवसात जगण्यासाठी उसनवारी घेत कर्ज काढत जगण्याचा प्रयत्न केला मात्र दीड वर्ष उलटले तरी अद्यापि कोरोनाच्या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकलेली नाही. मात्र नैराश्यातून आत्महत्यांच्या घटना वाढत आहे


डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील साई गॅलकसी या इमारती मध्ये सुरज सोनी पत्नी व दोन मुलासह राहत होता .डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेयरिंग खरेदी विक्री करत त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता . सगळं काही सुरळीत होतं मात्र त्यातच कोरोना आणि त्यापाठोपाठ लोकडाऊन जाहीर करण्यात आलं या लोकडॉन काळात सुरजच्या व्यवसायावर ही गदा आली. आणि  व्यवसाय ठप्प झाल्याने गेल्या दोन वर्षापासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता . थकलेलं घराचं भाडं लाईट बिल अन्नधान्याचा खर्च करताना त्याची।मोठी तारेवरची कसरत करावी लागत होते त्याने नोकरी शोधण्याचा देखील प्रयत्न केला मात्र ते त्याला अपयश आलं . परिस्थिती इतकी वाईट होती की घरचे लाईट बिल भरण्यासाठी देखील सुरजकडे पैसे नव्हते काही महिन्यापूर्वी त्याच्या घराचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता . तर थकलेलं घरभाडं, वाढत चाललेले उसनवारी आणि त्यात कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड. यामुळे सुरज नैराश्यात गेलं आणि सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने आपली पत्नी व मुलांना त्यांच्या भावाकडे सोडलं व राहत्या घरी गळफास घेऊन  आपली जीवनयात्रा संपवली .त्याच्या मागे पत्नी, 13 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी असा परिवार असून त्याच्या जाण्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाचे भवितव्य आणखीनच काळवंडले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *