कल्याण : कल्याण पश्चिमेतील दत्त आळी परिसरात राहणारी हंसाबाई ठक्कर या ७० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे

हंसाबाई या घरात एकटयाच राहत होत्या. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे त्या फोन उचलत नसल्याने नातेवाईकांनी घरी येऊन पाहिलं असता त्यांचा मृतदेह रक्ताच्या थोराळयात आढळून आला याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *