कल्याणात तरूणाची हत्या : भांडण सोडविण्याची मध्यस्थी जिवावर बेतली 

कल्याण (प्रवीण आंब्रे ):  भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरूणावर एका टोळक्याने सशस्त्र  हल्ला चढविला.  त्या हल्ल्यात तो तरूण ठार झाला असून आफ्रिदी शहा (२३) असे त्याचे   नाव आहे  ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने खडेगोळवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी रात्री याच परिसरात बबलू चौरसिया आणि त्याच्या साथीदारांचे अन्य एका तरूणाबरोबर भांडण झाले. त्यावेळी आफ्रिदीने त्यांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. त्याचा बबलू चौरसिया याला राग आला. बबलू आणि त्याच्या साथीदारांनी आफ्रिदीला मारहाण करण्यास सुरूवात केली. आफ्रिदीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात जखमी झालेला आफ्रिदी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तेव्हा हल्लेखोर टोळक्याने तेथून पलायन केले. या हल्ल्यात आफ्रिदीचा जागीच मृत्यू झाला. याच धुमश्चक्रीत आणखी एक तरूण देखील जखमी झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. भांडण सोडविण्याच्या क्षुल्लक कारणातून आफ्रिदी यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. हल्लेखोरांपैकी बबलू चौरसिया हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *