कल्याण : भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे. जनतेच्या मनात काय सुरू आहे आताच्या निवडणुक निकलावरूनही त्यांना समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा कळेल असे सुतोवाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बालत होते. . खोटं बोला पण रेटून बोला अशी भाजपची भूमिका असल्याने भाजप कसा आहे हे आता जनतेला कळू लागले आहे अशीही टीकाही पटोले यांनी यावेळी केली.

प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असून त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेंच आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकत्र लढायचे किंवा वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही पटोले यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *